सोमवार, ३ फेब्रुवारी, २०२५
रावणाच्या
अतृप्त ईच्छा
लक्ष्मणाला अशा वेळी रावणाकडे जाणे व त्याला भेटणे काही
रुचले नाही. परंतु मोठ्या
भावाची, प्रत्यक्ष प्रभू श्री रामाची आज्ञा आहे म्हणून
नाईलाजाने का होईना लक्ष्मण रणभूमीकडे, जिथे रावण धारातीर्थी
पडला होता तिथे पोहोचला.
लक्ष्मणाला पाहताच मरणासन्न रावण थोडासा सावरला व त्याने लक्ष्मणाला येण्याचे कारण विचारले. “रामाची आज्ञा आहे
म्हणून आलो. बाकी काही नाही.
मरण्यापूर्वी तुम्हाला काही सांगायचं असेल तर सांगा. मी
तुमचा निरोप श्रीरामाला सांगेन” असं थोडंस उर्मट उत्तर
लक्ष्मणाने दिल.
रावण खिन्न हसला व म्हणाला “हे लक्ष्मणा, अरे खूप
इच्छा होती रे, हा सतत खवळणारा समुद्र कायमचा शांत करून टाकावा. त्याच्या पाण्याचा लोकांना काहीही उपयोग नाही रे. ते सार खारट पाणी गोड करून टाकावं. पण आज करू उद्या करू असं म्हणत ते राहूनच
गेलं. संपूर्ण खारा समुद्र गोड करण्याची शक्ती होती रे
माझ्याकडे. पण जे राहून गेल ते राहून गेलं”.
“असं
वाटायचं की या पृथ्वीवरच्या सर्व मानवांना अगदी सहजगत्या स्वर्गापर्यंत पोहोचता यावं म्हणून पृथ्वीपासून स्वर्गापर्यंत एक
शिडी तयार करावी. पण आज करू, उद्या करू
असं म्हणत ते राहूनच गेल. पृथ्वीपासून स्वर्गापर्यंत शिडी
बांधायची शक्ती होती रे माझ्याकडे. पण ते राहूनच गेलं. लक्ष्मणा, आज मीच असा शक्तीहीन अवस्थेत इथे पडून
आहे. आता मला तर फारसं बोलता ही येत नाही. आता मनात जी काम करायची होती ती राहून गेली. आता मी
ती कशी काय करू?”
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
सीता स्वयंवरातील अव ज ड 'पिनाक' पांडुरंग काळे हे सद्गृहस्थ अतिशय धार्मिक व कुटुंबवत्सल. तालुक्याच्या ठिकाणी त्यांचं...
-
सीता स्वयंवरातील अव ज ड 'पिनाक' पांडुरंग काळे हे सद्गृहस्थ अतिशय धार्मिक व कुटुंबवत्सल. तालुक्याच्या ठिकाणी त्यांचं...
-
वेद , उपनिषद , पुराण , रामायण ते महाभारत जगातील सर्व ज्ञान वेदांमध्ये ठाई-ठाई भरलं आहे. ‘ ऋग्वेद ’, ‘ सामवेद ’, ‘ यजुर्वेद ’, ...
-
रावणाच्या अतृप्त ईच्छा आपण काहीतरी उद्योग करावा , धंदा करावा असं लक्ष्मण राव जोशी साहेबांना त्यांच्या तरुणपणी नेहमी वाटायचं. पण स...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा