गुरुवार, २३ जानेवारी, २०२५

 


पार्वती काकूंचे सुवर्णमृग


 


 



 


 

पार्वती काकू कपाळाला हात लावून बसल्या होत्या. रडून रडून त्यांची आसव सुद्धा सुकली होती. काय करावं? कोणाला सांगावं? कळत नव्हतं. पार्वती काकूंचे यजमान शंकररा यांच अकाली निधन झाल्यानंतर त्यांचा प्रॉव्हिडंट फंड व ग्रॅज्युएटीचे पैसे कंपनीने पार्वती काकूंच्या नावाने राष्ट्रीकृत बँकेत जमा केले होते. थोडी थोडकी रक्कम नव्हती. अगदी सहा लाख रुपये होती. बँकेच्या मॅनेजरने त्यांना सल्ला दिला की हे पैसे जर त्यांनी फिक्स डिपॉझिट मध्ये ठेवले तर त्यांना दरमहा चांगलं व्याजही मिळेल व घर चालवायला मदतही होईल.  पार्वती काकू तशा एकदमच अडाणी नव्हत्या. थोड्याफार शिकलेल्याही होत्या. आजूबाजूला जे काही घडतंय याची त्यांना जाण पण होती. कधी जमलं तर वर्तमानपत्र पण वाचायच्या. घरात टीव्ही तर होताच, त्याच्यावर बातम्या पण ऐकायच्या.

 

अगदी 'शेरेकर' पासून सुरुवात करून अगदी हल्ली हल्ली पर्यंत झालेल्या मल्टी लेयर मार्केटिंग मधील फसवणुकीच्या प्रकारांबद्दल त्यांना थोडीफार कल्पना देखील होती. पण तरीदेखील त्यांचा तरुण मुलगा प्रकाश याचा अतिशय जवळचा मित्र संतोष खंडेलवाल याने त्यांना गळ घातली. दर महिन्याला एक लाख रुपयाला पाच हजार रुपये व्याज अथवा परतावा मिळेल अशी 'गोल्डन डियर स्कीम' त्याने समजावून सांगितली. पार्वती काकूंना यावर आधी विश्वास बसत नव्हता त्यावेळी संतोष खंडेलवालने "काकू तुम्ही घाबरू नका. तुमच्या पैशाला मी गॅरेंटर आहे. पैसे बुडाले तर मी खिशातून देईन"  असे आश्वासनही दिले होते. त्यामुळे पार्वती काकू निर्धास्त राहिल्या. आपल्या मुलाचा अगदी लहानपणापासूनचा जवळचा मित्र, विश्वास ठेवायला काय हरकत आहे? आणि पैसे बुडालेच तर तो नक्की णून देईल म्हणून पार्वती काकूंनी बँकेमध फिक्स डिपॉझिट तोड. सहा लाखापैकी पाच लाख रुपये त्यांनी आपल्या बचत खात्यात ठेवले व उरलेले एक लाख रुपये त्यांनी संतोष खंडेलवालला गोल्डन डियर स्कीम मध्ये ठेवण्यासाठी दिले.

 

एक महिना झाल्यानंतर स्वतः संतोष खंडेलवाल, सांगितल्याप्रमाणे ५ हजार रुपयाचा चेक घेऊन पार्वती काकूंच्या घरी पोहोचला. तो चेक बघून पार्वती काकूंचा हर्ष गगनात मावेना. त्यांनी संतोषला आधी चहा दिला आणि मग एका हाताने तो चेक घेतला तर दुसऱ्या हाताने आणखीन एक लाख रुपयाचा चेक गोल्डन ईगल स्कीम मध्ये ठेवण्यासाठी दिला. दुसऱ्या महिन्यात संतोष खंडेलवाल दहा हजार रुपये रुपयांचा चेक घेऊन पार्वती काकूंच्या घरी जेव्हा गेला तेव्हा पार्वती काकू त्याची वाटच बघत होत्या. यावेळी संतोष खंडेलवालला पार्वती काकूंनी चहाबरोबर पोहे देखील दिले व दहा हजाराचा चेक घेऊन आपल्या खात्यात उरलेले तीन लाख रुपये सुद्धा खंडेलवालच्या हवाली केले. पुढच्या महिन्यात आठ तारखेला नेहमीप्रमाणे खंडेलवाल परताव्याची रक्कम घेऊन येणार म्हणून पार्वती काकूंनी त्याच्यासाठी आधीपासूनच गोड शिरा करून ठेवला होता. खंडेलवालला गोड शिरा खूप आवडायचा. यावेळी त्याच्यासाठी काकूंनी शिऱ्यात  थोड्या मनुका आणि काजू देखील टाकले होते. शेवटी मुलाचा अतिशय जवळचा आणि विश्वासू मित्र होता ना तो.

 

संध्याकाळचे सहा वाजले. सात वाजले. आठ वाजले. संतोष खंडेलवाल अजूनही आला नव्हता. पार्वतीकाकूंचा धीर सुटत चालला. त्यांनी प्रकाशला खंडेलवालला फोन करायला सांगितला. संतोष खंडेलवालचा फोन स्विच ऑफ येत होता. तेव्हा काकूंनी प्रकाशला खंडेलवालच्या घरी जाऊन चेक घेऊन यायला सांगितलं. प्रकाश खंडेलवालच्या घरी पोहोचला तेव्हा घरात संतोष नव्हता पण त्याचे वडील मात्र होते. वडील रडत होते. संतोष खंडेलवालची आई कोपऱ्यात गपचूप बसली होती. प्रकाशने काय झालं असं विचारतात संतोषच्या वडिलांनी पोलिसांनी संतोषला पकडून नेलं असं सांगितलं. गोल्डन डियर स्कीमच ऑफिस बंद झालं होतं. त्याचे मालक पळून गेले होते. गुंतवणूकदारांनी पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर गोल्डन डियर स्कीमने ज्या ज्या लोकांना एजंट म्हणून नेमलं होतं त्या सर्वांना पोलिसांनी अटक केली होती.

 

राम, लक्ष्मण व सीता वनवासात असताना सीता कुटीच्या दरवाज्यापाशी बसली होती. इतक्यात तिने एक सुवर्णमृग पाहिला. सुवर्णमृग पाहताच सीतेचे भान हरपले. त्याच्या चमचमत्या सोनेरी कांतीने तिचे डोळे दिपले. या सुवर्णमृगाला जिवंत पकडावे, त्याला पाळावे व आपले मनोरंजन करावे असे तिला वाटू लागले. जर का हा सुवर्णमृग जिवंत पकडला गेला नाही तर त्याच्या चामड्याचे मृगासन करावे व त्यावर आपण श्रीरामासोबत बसावे असेही तिला वाटू लागले. तशी इच्छाही सीतेने प्रभू रामाला बोलून दाखवलीसीतेच्या सोबतीला नेहमीप्रमाणे लक्ष्मण होताच त्यामुळे रामाला चिंता नव्हती. आपल्या प्रिय पत्नीची इच्छा पूर्ण करण्यासाठी श्रीराम आपल्या कुटी बाहेर पडून सुवर्णमृगाला पकडण्यासाठी जंगलात निघून गेला होता. बराच वेळ झाला तरी श्रीराम परतले नाहीत. इतक्यात लक्ष्मण आणि सीतेला दुःखी, कष्टी व वेदनेने व्याकुळ झालेल्या श्रीरामाच्या हाका ऐकू आल्या. त्यामुळे सीतेला वाटले की श्रीराम कुठल्यातरी संकटात आहेत. तिने लक्ष्मणाला श्रीरामाच्या मदतीला जाण्याची आज्ञा केली. लक्ष्मण हुशार होता. हे सुवर्णमृग नसावे. मायावी असावे किंवा यात काहीतरी धोका असावा असा त्याला संशय होता. श्रीरामाला पृथ्वीतलावर कोणीही हरवू शकत नाही किंवा मारू शकत नाही याची लक्ष्मणाला पूर्ण खात्री होती परंतु सीता काही ऐकायला तयार नव्हती. सीतेने आग्रह नव्हे तर आज्ञाच केली होती म्हणाना.  मोठ्या वहिनीची आज्ञा ही मातृआज्ञा असते. त्यामुळे मनात नसूनही लक्ष्मणाला सीतेला कुटीतच सोडून रामाच्या मदतीला सीतेपासून दूर जावे लागले. आणि त्यानंतर जे घडले ते रामायण आपल्या सर्वांनाच माहित आहे

 

मोह आणि लोभापाई मनुष्य आंधळा होतो आणि तारतम्याने विचार करणंच तो विसरून जातो.  जिथे राष्ट्रीकृत बँका वर्षाला फक्त सहा टक्के परतावा देतात तिथे एक लाखाला महिन्याला पाच हजार रुपये म्हणजेच एक लाखाला वर्षाला साठ हजार रुपये परतावा मिळणे म्हणजे साठ टक्के परतावा मिळणे होय. सर्वसाधारण परताव्यापेक्षा दहापट अधिक परतावा मिळेल या सुवर्णमृगामागे लागणारे मूर्खच म्हणायला हवेत. कोणत्याही धंद्यात जर एवढा परतावा मिळत असेल तर माणसं दुसरा धंदा का बर करतील? आणि ज्यांच्याकडे अमाप पैसा पडला आहे ते तो पैसा बँकेत सहा टक्के परताव्याने का बर ठेवतील? एवढा साधा विचार करणं देखील आपण सोडून देतो आणि जे खड्ड्यात पडतो ते कधीही न उठण्यासाठी.

 

पार्वती काकूंनी देखील रामायण वाचलं होतं पण त्यांच्या रामायणाच्या पुस्तकातील नेमकं याच गोष्टीच पान गहाळ झाल होत.

 

बुधवार, २२ जानेवारी, २०२५

 

शबरीची न उष्टवलेली बोरे

 

अश्विन भाई आपल्या कार्यालयात बसून काम करण्यात गढून गेले होते. तसा त्यांच्यावर कामाचा प्रचंड ताण असायचा. धंदा वाढला होता आणि म्हणावे तेवढे कुशल कामगार कारखान्यासाठी मिळत नव्हते.  त्यामुळे अश्विन भाईंचा बहुतेक वेळ कारखान्यात कामगारांना ट्रेनिंग देण्यात व त्यांची सुपरविजन करण्यातच जायचा. जेवढा वेळ उरेल तेवढा वेळ कार्यालयात बसून ते बँक, पत्रव्यवहार, हिशोबदी व्यवहार पाहत.

 

सावंत मास्तर त्यांच्या कार्यालयात कित्येक वर्षापासून हिशोबाच काम पाहत. बँकेचे व्यवहारही तेच पाहत. अनेक दिवसापासून देणेकर्‍यांनी पैसे मागायला सुरुवात केली होती.  कालच बँकेत पैसेही आले होते म्हणून सावंत काकांनी अनेकांचे चेक बनवून अश्विन भाईंच्या सहीसाठी त्यांच्या टेबलवर ठेवले होते.

 

अश्विन भाईंचे जेव्हा त्या चेककडे लक्ष गेले तेव्हा त्यांनी आपला ड्रॉवर उघडला व त्यातील पेन शोधायला सुरुवात केली. शोधाशोध केल्यानंतर एक पेन मिळालं पण त्यातील रिफील संपल्यामुळे त्याचा काहीच उपयोग नव्हता.  त्यांनी बेल दाबली व रघु शिपाई आता आला.

 

जारे जरा नवीन बॉलपेन घेऊन ये अश्विन भाईंनी त्याला ऑर्डर दिली. त्या सरशी रघु शिपाई चटकन ऑफिसच्या बाहेर गेला आणि जवळच असलेल्या एका दुकानातून त्याने एक बॉलपेन विकत घेतले.  बॉलपेन घेऊन रघु धावत धावतच अश्विन भाईंच्या केबिनमध्ये घुसला व ते बॉलपेन त्याने अश्विन भाईंना दिले.

 

अश्विन भाईंनी बॉलपेनचे झाकण उघडले आणि झटक्यात त्यांनी त्यातील पहिल्या चेकवर सही केली. पण बघतात तो काय, ते बॉलपेन लाल शाईचे होते. बँकेत लाल शाई चालत नव्हती. तो चेक फुकट गेला. पुढे अश्विन भाई ना राग आला, ते रघु शिपायावर रागावले वगैरे वगैरे या गोष्टीला फारसा अर्थ नाही. अश्विन भाईंना बॉलपेन देण्यापूर्वी ते चालते का? ते कोणत्या रंगाचे आहे? हे रघु शिपायाने तपासायला हवे होते. या सर्वांची खात्री झाल्यावरच आपले वरिष्ठ असलेल्या अश्विन भाईंना रघु शिपायाने ते पेन दिले पाहिजे होते.  

 

प्रभू रामचंद्र आपल्या झोपडीत येणार हे ऐकून खुश झालेल्या शबरीला त्यांच्यासाठी काय करू आणि काय नको असं झालं होतं.  परंतु शबरी पडली एक गरीब वनवासी महिला.  एवढ्या मोठ्या अयोध्येच्या राजपुत्राला नव्हे अयोध्येच्या राजाला काय द्यायचं हे तिलाच कळत नव्हतं.  शेवटी तिच्या झोपडीसमोर एक बोराच भलं मोठं झाड होतं. झाडाला टपोरी आंबट गोड बोर लागली होती. काळपट लाल रंगाची बोरं चवीला खूप सुंदर होती. पण त्यातील काही बोरं आंबट देखील असायची.  ही बोर आपण प्रभू रामाला खायला देऊ असा शबरीने विचार केला. पण त्याच वेळी तिच्या मनात असा ही विचार आला की जर यातील काही बोर आंबट निघाली तरमाझ्या प्रभू रामाची चव बिघडेल. तो दुःखी होईल. त्याला गोड बोरच दिली पाहिजेत. त्यामुळे शबरीने प्रत्येक बोर चावून बघितलं. जी बोर आंबट होती ती बाजूला काढली व केवळ गोड बोर एकत्र करून प्रभू रामाला अर्पण केली.

 

शबरीने उष्टावलेली ही बोर देखील प्रभू रामचंद्राने मोठ्या आवडीने व प्रेमाने खाल्ली कारण शबरीच्या त्या उष्टावण्यामागे चांगला उद्देश होता. या उद्देशापुढे ती बोरं उष्टवली गेली आहेत ही बाब गौण ठरली  आणि शबरी इतिहासात अमर झाली.

 

आपल्याकडे पाहुणे येतात त्यांच्यासाठी आपण चहा, फराळ आणि अगदी जेवण सुद्धा करतो. अशावेळी चहामध्ये साखर नीट पडली आहे ना? जास्त किंवा कमी नाही ना? हे चहा देण्याआधी तपासून पाहिला नको का? भाजीत किंवा आमटीत मीठ किंवा मसाला कमी जास्त तर नाही ना? हे आधी चाखून पाहायला नको का? आपण जे पत्र तयार करतो, जो रिपोर्ट तयार करतो किंवा आपल्या वरिष्ठांना देण्यासाठी जी काही कागदपत्रे तयार करतो ती त्यांना देण्यापूर्वी पुन्हा-पुन्हा काळजीपूर्वक वाचून त्यातील चुका दुरुस्त करून व त्यातील मजकूर अगदी बरोबर आहे ना याची खात्री करून  घ्यायला नको का? शबरीची कथा नुसती ऐकली नाही तर जर नीट ऐकली तर प्रभू रामचंद्र आपल्यावर नेहमीच कृपा करेल याची खात्री बाळगा.

 

अश्विन भाईंच्या कार्यालयातील रघु शिपायाने  सुद्धा जर शबरीच्या गोष्टी मागील भाव समजावून घेतला असता तर त्यालाही अमर होण्याची संधी होती पण ती आता चुकलीच म्हणा ना. पण मला माहित आहे की रघु शिपायाच्या आईने त्याला शबरीची गोष्ट लहानपणी नक्कीच सांगितली होती पण शबरीच्या गोष्टीतील अर्थ मात्र त्याला समजावून सांगितला नव्हतारघु शिपायाला शबरीची गोष्ट माहीत होती पण त्या मागील बोध मात्र माहीत नव्हता त्यामुळे रघुला अश्विन भाईंच्या शिव्या खाव्या लागल्या.

 

 

 

मंगळवार, २१ जानेवारी, २०२५

 

वेद, उपनिषद, पुराण, रामायण ते महाभारत




 

जगातील सर्व ज्ञान वेदांमध्ये ठाई-ठाई भरलं आहे.  ऋग्वेद’, सामवेद’, यजुर्वेद’, अथर्ववेद हे ४ वेद सनातन धर्माचे धर्मग्रंथ आहेत. संस्कृत भाषेमध्ये रचल्या गेलेल्या अनेक ऋचांचा संग्रह म्हणजे वेद.  वेद हे अपौरुषे आहेत.  ते कोणी एका व्यक्तीने रचलेले नाहीत.  ते एका वेळी रचलेले नाहीत. असंख्य ऋषीमुनींच्या आश्रमामध्ये, अनेक वर्षांच्या तपश्चर्येने जे निष्पन्न झाले आहे ते वेदांमध्ये सामावले आहे.  आजच्या भाषेत बोलायचे झाले तर अनेक रिसर्च स्कॉलर्सनी त्यांच्या रिसर्च लॅबोरेटरी मध्ये अनेक वर्षांच्या रिसर्चने, संशोधना अंती जे निष्कर्ष काढले आहेत ते वेदांमध्ये सामावले आहेत.


पूर्वीच्या काळी अनेक ऋषींचे आश्रम असायचे.  हे ऋषी जरी अनेक विषय जाणायचे तरी खास करून एखाद्या विशिष्ट विषयात अधिक रुची ठेवायचे.  त्यांचा आश्रम म्हणजे एक प्रयोगशाळाच होती.  तसं ते एक विद्यापीठ देखील होतं. या आश्रमात साहित्य, व्याकरण, संगीत, कला, धर्म, संस्कृती, राजकारण, अर्थकारण, युद्धकला, शस्त्र-अस्त्रनिर्मिती, विज्ञान, औषध शास्त्र, चिकित्सा शास्त्र, खगोल विज्ञान, दी असंख्य विषयांवर सातत्याने संशोधन चालू असायचं. आणि या संशोधनातून जो निष्कर्ष निघायचा तो वेदांमध्ये समाविष्ट व्हायचा. अशा रीतीने वेदांच्या ऋचा वाढत गेल्या.


दर बारा वर्षानंतर होणाऱ्या प्रयागराज मधील कुंभात तसेच उज्जैन’, ‘नाशिकहरीद्वार येथील लघु कुंभात हे सारे तपस्वी, ऋषी, मुनी एकत्र यायचे आणि त्यावेळी त्यांच्या आश्रमात म्हणजेच प्रयोगशाळेत जे निष्कर्ष निघाले  त्यांचे सादरीकरण म्हणजेच आजच्या भाषेत प्रेझेंटेशन व्हायचे.  यावर सांगोपांग चर्चा व्हायची.  अनेक प्रश्न आणि उपप्रश्न विचारले जायचे.  प्रबंध सादर करणाऱ्या ऋषीला या साऱ्या प्रश्नांची  पटतील अशी उत्तरे द्यावी लागायची. आणि एकदा का निष्कर्ष सर्वांना मान्य झाला की त्याचे रूपांतर संस्कृत ऋचे व्हायचे  व नंतरच ही ऋचा चार वेदांपैकी जो त्या विषयाला अनुरूप असेल अशा वेदात समाविष्ट व्हायची.


वेद हे ज्ञानाचे भांडार होते.  परंतु ते ज्ञान सर्वसामान्य माणसाला समजणं कठीण होतं.  सर्वसामान्य माणसाला ते कळावं म्हणून वेदांचा एक सोपा फॉर्म म्हणजे उपनिषद. वेदांमध्ये असलेलं ज्ञानजे सामान्य माणसाला आवश्यक आहेते उपनिषदामधून लोकांपर्यंत पोहोचविण्याचाही प्रयत्न झाला. सनातन धर्मात १०८ विविध 'उपनिषद' आहेत. त्यातील  ‘ईश’, ‘कठ’, ‘तैत्तिरीय बृहदारण्यक ही यजुर्वेदावर आधारीत, ‘केन छांदोग्य ही सामवेदावर आधारीत, ‘प्रश्न’, ‘मुंडक  मांडूक्य ही अथर्ववेदावर आधारीत तर ऐतरेयहे ऋग्वेदावर आधारीत १० उपनिषद मुख्य मानली गेली आहेत. जी देखील ज्ञानाची भांडारेच आहेत.


परंतु ज्या लोकांना 'उपनिषद' ही समजण्यात अडचण आली त्यांच्यासाठी आपल्या पूर्वजांनी आणखीन एक सोपा मार्ग शोधला.  तो म्हणजे पुराण. आपल्या सनातन धर्मात विष्णुपुराण, पद्मपुराण, ब्रह्मपुराण, शिवपुराणभागवतपुराणनारदपुराणमार्कंडेयपुराणअग्निपुराणब्रह्मवैवर्तपुराणलिंगपुराणवराहपुराणस्कंदपुराणवामनपुराणकूर्मपुराणमत्स्यपुराण, गरुड़पुराण, ब्रह्मांडपुराण व भविष्यपुराण ही १८  पुराणे सांगितली आहेत. यात देखील उपनिषदांमध्ये सांगितलेलं ज्ञानआणखीन सोपं करून सांगितलं आहे.  


परंतु ज्या लोकांना पुराणही समजण्यात अडचण आली त्यांच्यासाठी आपल्या पूर्वजांनी आणखीन एक सोपा मार्ग शोधला.  तो म्हणजे रामायण आणि महाभारत’. या महाकाव्यात देखील वेदांमध्ये सांगितलेलं ज्ञानजे उपनिषदामध्ये सोपं करून सांगितलं, जे पुराणांमध्ये आणखीन सोपं करून सांगितलं  ते  आपल्याला रामायण आणि महाभारतामधील अतिशय सोप्या गोष्टींमधून मिळू शक.


रामायण आणि महाभारतामधील प्रत्येक गोष्ट ही काही मनोरंजनासाठी तयार केलेली गोष्ट नाही.  प्रत्येक गोष्ट ही आपल्याला काहीतरी बोध देते. किंबहुना सर्वसामान्य माणसाने यातून ज्ञान अथवा बोध घ्यावा हीच रामायण आणि महाभारत या दोन पवित्र ग्रंथामागील कल्पना आहे.  परंतु रामायण आणि महाभारत याला जर आपण कादंबरी समजायला लागलो तर मग मात्र रामायण आणि महाभारताचा मूळ उद्देशच संपुष्टात येतो आणि पालथ्या घड्यावर पाणी पडते.


यापुढे रामायण आणि महाभारतामधील विविध कथा संक्षिप्तपणे सांगून त्यातून आपण काय बोध घेऊ शकतो हे सांगण्याचा प्रयत्न करणार आहे.  आपणा सर्वांना हा प्रयत्न आवडेल याची खात्री आहे.

 




 

  सीता स्वयंवरातील अव ज ड 'पिनाक'       पांडुरंग काळे हे सद्गृहस्थ अतिशय धार्मिक व कुटुंबवत्सल.   तालुक्याच्या ठिकाणी त्यांचं...